मंगळवार, १६ एप्रिल, २०१३


 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे युगपुरुष,या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. 'भारतीय घटनेचे शिल्पकार', माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा मूळ उद्देश होता,कोकणातील अन्यायकारक खोत पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी. १९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री,भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री,डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते.कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १०० विद्वानाच्या यादीत प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. 
      अशा या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन अन कोटी कोटी प्रणाम.

बुधवार, १० एप्रिल, २०१३

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षदिन!


गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षदिन!
        
                        
      हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात गुढीपाडवा.गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ! युगादी तिथीचैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्र शुक्ल एकादशीशी अनेक महत्त्वाचे दिवस निगडीत आहेत.ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलीम्हणजे सत्ययुगाला सुरुवात झालीतो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. दुर्गेच्या उपसानेचा दिवसही हाच. श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक,सम्राट विक्रमादित्याद्वारे विक्रम संवतचा प्रारंभयुधिष्ठिराचा राज्याभिषेकयुगाब्ध संवत प्रारंभ,शीखांमधील द्वितीय गुरू अंगद देवजी यांचा जन्मवरूण अवतार असलेल्या झुलेलाल यांची जयंतीआर्य समाजाचा स्थापना दिवसशालिवाहन शकाचा आरंभ.
गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्वही आहे .वसंत ऋतूचा  प्रारंभयाच दिवशी होतो. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असताततर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
     गुढी पाडव्याचे ऐतिहासिक महत्त्वम्हणजे रामाने वालीचा वध या दिवशी केला. दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस. रावणवधानंतर अयोध्येला परतणार्‍या रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. विजयाचे प्रतीक हे उंच असतेम्हणून गुढी उंच उभी केली जाते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्यासैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्यानेयाच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणनाशालिवाहन शक चालू केले.त्या अर्थाने गुढीपाडवा हा बहुजनांचा विजयोत्सव आणि वर्षारंभदिवसही म्हणू शकतो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एकगुढीपाडवाअक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धाअसे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे कीइतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतोया दिवशी नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.गुढीपाडव्याला वेळूची काठी स्वच्छ धुवूनतिला तांबडे वस्त्र नेसवूनफुलांची माळ व साखरेची गाठी,कडूनिंब बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. खाली रांगोळी काढली जाते. अष्टगंध अक्षता लाऊन पूजा करून मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच उभारून आनंद साजरा करतात.या दिवशी घरात गोडधोड बनवले जाते.या शुभदिनी नव्या वर्षात चांगले कार्य करण्याचा संकल्पकेला जातो व शुभेच्छा दिल्या जातात.
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.