डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे युगपुरुष,या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. 'भारतीय घटनेचे शिल्पकार', माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा मूळ उद्देश होता,कोकणातील अन्यायकारक खोत पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी. १९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री,भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री,डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते.कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १०० विद्वानाच्या यादीत प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे.
अशा या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन अन कोटी कोटी प्रणाम.
